झोपायला घेतली जरीची साडी !
लग्न म्हणजे घाई गडबड गोंधळ आलाच. त्याच्या गमती जमती आल्या. अशीच एक गमतीशीर घटना माझ्या आत्याच्या लग्नात घडली होती . माझी आत्या " मंगल आत्या" हिचे लग्न ठरले साधारण १ ९ ९ २ साली तेव्हा आम्ही शाळेत शिकत होतो. मी तेव्हा ८ वी मध्ये असेन. कोल्हापूरला मे महिन्याच्या दिवसात तिचे लग्न ठरले होते. आम्ही सारी बच्चे कंपनी जाम खुश होतो कारण आम्हाला फारच धमाल करायला मिळणार होती. कोल्हापूरला आमचा स्वतंत्र छोटसं घर आहे. तिथे तेव्हा वरती मोठी गच्ची होती. तिथे आम्ही खूप खेळायचो. घरातील काही जास्तीच असणार सामान देखील तिथेच ठेवलं होत. लग्न घर असल्यामुळे तिथे अंथरूण-पांघरूण ठेवली होती. कपडे वाळत घालण्याची ती हक्काची जागा होती.
लग्नाला केवळ २ दिवस सीमांतपूजन धरून उरले होते. हॉल मधील व्यवस्था पाहण्यासाठी म्हणून माझे वडील, आजोबा आणि काका हि सर्व मंडळी बाहेर गेली होती. आम्ही मुले अंगणात खेळत होतो. सर्व बायका घरात कामाच्या गडबडीत होत्या. आणि संध्याकाळच्या सुमारास अचानक जोरदार वादळ सुटल आणि गारांचा पाउस पडायला सुरवात झाली. भरपूर गारपीट झाली. आम्ही सारे जमेल तसे गारा वेचून खाण्यात मग्न होतो. अंधारून गेल्यामुळे आम्ही घरात गेलो. कपडे ओले, रस्ते ओले. सगळे चिखलाचे पाय घरात यायला लागले तशी काकू वैतागली. दरम्यान लाईट हि गेले होते. त्यामुळे पायपुसणे शोधण्यासाठी तिची धावपळ सुरु झाली. ते काही केल्या तिला सापडेना. मग आम्हाला तिने विचारले कुठे पहिले का ? ठेवले का? मग कोणीतरी पाय घसरून पडेल म्हणून आम्ही हि शोधायला सुरवात केली. आणि अचानक आमच्या लक्षात आले कि सर्व अंथरूण पांघरूण आणि अशाच काही गोष्टी गच्ची मध्ये ठेवल्या आहेत. काकूला सांगितलं तेव्हा आईने आणि काकूने कपाळाला हात लावला अग्गोबाई ! म्हणजे आता ते सर्व भिजून गेले असेल , मग आपण झोपणार कशावर ? पांघरणार काय ? आई चिडली आणि म्हणाली कोणी हा प्रकार केला? आता आजोबा पण चिडतील. पाउस येण्याची शक्यता लक्षात घेऊन तिथे पांघरून ठेवायची नाहीत अस ठरवलं होत सर्वांनी, मग कोणी ठेवली ? सर्वजण शांत बसले.
त्यानंतर जवळ पास दोन तासांनी घरातील सर्व पुरुष मंडळी घरी आली. त्यांना हा प्रकार सांगितला. मग माझ्या बाबांना आठवले कि सकाळी अंगणात काहीतरी काम होते म्हणून त्यांनीच ती वर ठेवायला सांगितली होती. थोड्या वेळाने ती परत खाली ठेवू असा त्यांचा विचार होता , पण कामच्या गडबडीत ते विसरले यावर सगळेजण हसू लागले .
मग आईने विचारले , "पण आता आणखीन पाहूणे येणार तर मग झोपायचे कशावर ? आणि पांघरायचे काय?" आजोबा हसून म्हणाले , " आता झोपा जर काठच्या साड्या पांघरून. आणि खरोखरच आम्हाला साड्या वर झोपायला लागले .
लग्नाच्या दिवशी काय घालायचे ते मग पाहू असे ठरले.
त्यानंतर जवळ पास दोन तासांनी घरातील सर्व पुरुष मंडळी घरी आली. त्यांना हा प्रकार सांगितला. मग माझ्या बाबांना आठवले कि सकाळी अंगणात काहीतरी काम होते म्हणून त्यांनीच ती वर ठेवायला सांगितली होती. थोड्या वेळाने ती परत खाली ठेवू असा त्यांचा विचार होता , पण कामच्या गडबडीत ते विसरले यावर सगळेजण हसू लागले .
मग आईने विचारले , "पण आता आणखीन पाहूणे येणार तर मग झोपायचे कशावर ? आणि पांघरायचे काय?" आजोबा हसून म्हणाले , " आता झोपा जर काठच्या साड्या पांघरून. आणि खरोखरच आम्हाला साड्या वर झोपायला लागले .
लग्नाच्या दिवशी काय घालायचे ते मग पाहू असे ठरले.