बस ड्राईवर आणि कंडक्टर यांना आपण नेहमीच नावे ठेवतो. ते अरेराविने वागतात. वेळेवर बस आणत नाहीत. सुटे पैसे देत नाहीत. पण सगळी माणस काही सारखीच नसतात म्हणून विशिष्ट प्रकारचा चश्मा लावून सगळ्याकड़े पहाणे चुकीचे आहे. याच उत्तम प्रकारच उदहारण सांगते. एकदा नेहमी प्रमाने मी बस प्रवास करत होते अचानक गलाका सुरु झाला बस थांबली, ड्राईवर आणि कंडक्टर त्या गलाक्या कड़े गेले. लोक वैतागले आणि नाना अफवांचे पीक आले. कोण म्हणे मगाशी बसने एक दुचाकीला उडवले म्हणून त्याने माणस गोला केली. आणि आता आपल्याला उशीर होणार असे आम्हाला वाटू लागले पण लगेच ड्राईवर येताना दिसला. सगळे शांत बसले, गाड़ी सुटली. एकाने न राहवून कंडक्टरला विचारले मगाशी नक्की काय झाले ? तेव्हा तो म्हणाला या ड्राईवरचा मुलगा गाड़ी वरुन पडला तो जरबरदस्त जखमी झाला आहे. त्याला आम्ही एका दुस्र्या माणसाबरोबर हॉस्पिटल मधे पाठवले आहे. आम्ही शर्मीले झालो. काय विचार करत होतो आणि काय झाले ? धन्य त्या ड्राईवरची !!! मुलगा जखमी असताना सुद्धा जराही विचलित न होता त्याने गाड़ी चालवली आणि आम्हा सगळ्याना सुखरूप ऑफिसला आणले. बस मधून उतरल्यावर मी त्यांच्याशी बोलले त्याचे कौतुक केल शिवाय त्याना धीर दिला. त्यांच्यामते वेळेवर गाड़ी आनने त्यांचे कर्तव्य होते. ते त्याना पार पाडायाचे होते. भारता सारख्या भ्रश्त्ताचाराने ग्रस्त देशात अशी ही कर्तव्या पुढे झुकनारी माणस पाहिली की त्यानाच सलाम ठोकावासा वाटतो . त्या बस चालकाचे नाव श्री. विजय तीखे. ही घटना घडली अभिनवच्या बस मधे.
Sunday, June 27, 2010
eka bus chalakas salam !!!
Subscribe to:
Comments (Atom)